“आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व रुग्णालयांनी लाभार्थ्यांना वेळेवर व दर्जेदार उपचार देणे बंधनकारक आहे,” असे निर्देश आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले आहेत. हा आदेश वर्ष २०२५ मध्ये लागू करण्यात आला असून, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सर्वांसाठी आरोग्य” या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
डॉ. शेटे यांनी सांगितले की, “आयुष्मान भारत योजना ही गरिबांना आणि गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देणारी क्रांतिकारी योजना आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहभागी रुग्णालयांनी कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांना नकार देऊ नये. योजनेअंतर्गत उपचार देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.” वर्ष २०२५ पासून नवे आदेश लागू या नव्या आदेशानुसार: योजनेतील लाभार्थ्यांना सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येऊ शकते. राज्यस्तरावर विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे.
रुग्णांचे तक्रार निवारण जलदगतीने होण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्यात आला आहे.

11 Responses

  1. Viva8, Alright, let’s add some viva to our game! I’m trying my best to score jackpot, and who knows I’ll become a millionaire. Best of luck to you fellas.viva8

  2. 8okbet? Yeah, I’ve spent a little time there. It’s alright when you’re bored. Sometimes the odds seem better than others elsewhere, so it’s worth comparing. Take a peek! 8okbet

Leave a Reply to meolucky Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *